अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात श्रीक्षेत्र कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीरसात न्हाऊन " />

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

By : Sangharshkranti Team ,2026-03-03

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 3 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात श्रीक्षेत्र कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी अशी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दिंडीत परिसरातील शेकडो वारकरी, महिला, युवक-युवती तसेच ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. गुरुवार, दि. ५ मार्च ते सोमवार, दि. ९ मार्च २०२६ या कालावधीत हा भक्तिमय प्रवास पार पडणार आहे.

दिंडीची सुरुवात अभिषेक व मंदिरातील पूजाविधीने होणार असून, गाव प्रदक्षिणेनंतर टाळ-मृदुंगाच्या निनादात वारकरी पुढील प्रवासास प्रस्थान करतील. मार्गातील विविध ठिकाणी महाप्रसाद, भजन-कीर्तन, हरिपाठ व हरीकथा यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून, भाविकांच्या सेवाभावामुळे वातावरण अधिक मंगलमय होणार आहे.

शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत विविध गावांतून दिंडीचा प्रवास होत अखेरीस श्री क्षेत्र मढी येथे महाल प्रदक्षिणा व समारोप सोहळा संपन्न होईल. शेवटच्या दिवशी पहाटे महाल प्रदक्षिणा करून दिंडीचा भक्तिमय समारोप करण्यात येणार आहे.

दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टतर्फे भोजन, निवास तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. “भक्ती हीच खरी शक्ती” या संदेशातून सर्वांनी शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभाव जपावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गेल्या २७ वर्षांची परंपरा जपत श्रद्धा, समर्पण आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही पायी दिंडी केवळ धार्मिक यात्रा नसून आत्मशुद्धीचा आणि सामाजिक एकतेचा सोहळा ठरत आहे. गुरुजींच्या ओजस्वी मार्गदर्शनामुळे या दिंडीला अध्यात्मिक अधिष्ठान लाभले असून, कोंभळी नगरी पुन्हा एकदा हरिनामाच्या गजराने दुमदुमणार आहे.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस