समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

By : Sangharshkranti Team ,2026-03-04

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

वाशिम [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] - समाजात घडणाऱ्या घटना व प्रश्नांवर सत्य आणि निःपक्षपाती दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले. पत्रकार हा समाज आणि शासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, समाजाला जागृत करणे आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी पत्रकारांनी सातत्याने पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.

      महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील वैकुंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर, वाटाणे लॉन येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप दिनकरराव वाटाणे होते. विशेष उपस्थिती म्हणून भागवताचार्य प.पू. रमाकांत व्यास, प.पू. गजानंद माऊली, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर व मातोश्री स्नेहलता सोमाणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

विविध समाजसेवक, उद्योजक, पत्रकार व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व विश्व कल्याण प्रार्थना प्रदान करण्यात आली. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात संत सावता माळी क्रीडा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले. वारकरी दिंडी, लेझीम पथक व विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी सोहळ्याला रंगत आणली.

        राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना आकर्षक बॅग, डायरी, पेन व दिनदर्शिका भेट देण्यात आली. वाशिम येथे अनेक वर्षांनंतर राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनाचे यशस्वी आयोजन झाल्याने जिल्ह्याच्या नावाची राज्यभरात चर्चा होत आहे.

चौकट - 

    विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान,या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. भागवताचार्य डॉ. रमाकांत व्यास यांना संत सेवाश्री,दिनकरराव वाटाणे यांना वारकरी सेवा, डॉ. हेमराज लाहोटी, डॉ. हरीश बाहेती, डॉ. सरोज बाहेती यांना विदर्भ भूषण, श्रीमती शिलाताई राठी व ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

चौकट - 

    विचारमंथन सत्रात पत्रकारितेच्या मूल्यांवर भर, 

द्वितीय सत्रात पत्रकारांचा डीएनए काय? सायबर युगातील माध्यमे व मूल्यनिष्ठ पत्रकारिता या विषयांवर चर्चासत्र झाले. ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांनी सत्य, संयम व समाजहित हाच पत्रकाराचा खरा डीएनए असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबाबत पत्रकारांनी सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

चौकट - 

    प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पत्रकारांसाठी लाडका पत्रकार योजना सुरू करण्याची मागणी मांडली.

     १५ ठरावांना एकमुखी मंजुरी, अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने १५ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. ठरावांचे वाचन डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी एकमुखाने ठरावांना मंजुरी दिली. 


शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस