By : Sangharshkranti Team ,2026-03-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन दि. ५ मार्चपासून सुरू होणार असून १४०० क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेते प्रा.राम शिंदे यांनी दिली.
या वेगाने पाणी सोडल्यामुळे कालव्यामधील सर्वच चाऱ्यांपर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचणार असून शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.
रब्बी पिकांना आधार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार
उन्हाळी आवर्तनामुळे रब्बी पिकांना आवश्यक असलेले पाणी वेळेत मिळणार आहे. मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. या पार्श्वभूमीवर ५ मार्चपासून सुरू होणारे आवर्तन हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या आवर्तनामुळे केवळ शेतीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. कर्जत तालुक्यातील तब्बल ५४ गावांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
ऊस, कांदा, डाळिंबासह फळबागांना नवसंजीवनी
या आवर्तनाचा फायदा ऊस, कांदा, मका, डाळिंब, केळी, पेरू आदी पिकांना होणार आहे. विशेषतः फळबागांसाठी उन्हाळ्यातील पाणी अत्यंत गरजेचे असते. योग्य वेळेत मिळणाऱ्या पाण्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध झाल्यास पिकांची वाढ, उत्पादनक्षमता आणि गुणवत्ता यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या उन्हाळी आवर्तनामुळे कर्जत तालुक्यातील शेतीला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस